aaichi icha

 बाबा म्हणाले जिंक फक्त

जग हे असच असत 

जिंकण्यापेक्षा काय आहे जास्त

मला हि हेच वाटे रास्त ||१||

भेटल्या असतील खूप जणी

आयष्यात नाही काही उणी

नसेल जरी का कुणी

पण ध्येय ठेवलाय मणी ||२||

जर ती भेटली तरच मी जिंकेन

हे मूर्खपणाचे आहे मी म्हणेन 

मी का कुणाला शमेन

जिंकलो तरच थांबेन ||३||

आई ची पण हीच इच्छा आहे

आई पेक्षा कोणी पोरगी का मोठी आहे

जिंकणे हे नित्य आहे

मग कशाला भियाची गरज आहे ||४||

पोरी साठी रडणे हे मला फुकाचे वाटते 

दम असेल तर कोणीही भेटते 

जर पोरगी मिळवणे हेच खरे ठरते

तर रतन टाटा अन अब्दुल कलाम कसे झाले असते ||५||

मूर्खानाच मुलीचे प्रेम मोठे वाटते 

शहाण्यासाठी जिंकणे हेच खरे असते

जेव्हा महत्वाकांक्षा मनाला शिवते 

तेव्हा फक्त आईच्या आशिर्वादाला महत्व असते ||६||

मी कसे म्हणेन आई ला मला जिंकायचे नाही

जर आईसाठी माझे जिंकणेंच आहे सर्व काही

ज्याला जे बोलायचे ते बोलत राही

मी तेच कारेन जे आहे नेमके सही ||७||

बस आटा खूप बोललो

मरेन जर मी माघारी फिरलो

आत्ता मी तहान मांडून बसलो

अन यशाच्या शिखरावर वसलो ||८||


Comments

Popular posts from this blog

Bhavu and Bahin

stri stuti

Lavani var kahi